Wednesday, May 12, 2010

रामभाऊ

१९७७ साली आणिबाणी उठली, निवडणुका झाल्या, प्रथमच केन्द्रात गैरकॉंग्रेसी सरकार आलं. या सार्‍या जनआन्दोलनात रा.स्व.संघाचा सहभाग मोठा होता.. या पार्श्वभूमीवर ७८-७९ च्या आसपास संपूर्ण देशभर एक व्यापक अभियान घेण्यात आलं. गावोगावी जाऊन ग्रामसभा घेऊन लोकांना संघासंबंधी माहिती सांगावी अस त्याच स्वरूप होत.

मी सोलापूर तालुक्यात नुकताच प्रचारक म्हणून दाखल झालो होतो. माझ्याकडेही काही गावे संपर्कासाठी देण्यात आली. असाच एक दिवस सायंकाळच्या मुक्कामी बसने दक्षिण सोलापुर तालुक्याच्या टोकावरील एका गावी निघालो. मुक्कामी गाडी, त्यामुळे गर्दी भरपूर.. रस्ता बेताचाच, धुरळा उडवणारा व खडकाळही.. बस मुक्कामी पोचेपर्यन्त अंग चिंबून गेल होत.. मी मुंबईच्या परिसरात, सुखात वाढलेला.. सारा अनुभव नवखा होता.. गावात संदर्भासाठी कुणाचंच नांव वगैरे हातात नव्हत. एका अनोळखी गावात प्रथमच, एकटाच पाऊल टाकत होतो. बस मुक्कामी असल्याने काहीही झालं तरी सकाळपर्यन्त परत जाण्याचे दोर कापलेलेच होते.

बस मधील प्रवासी पटापटा उतरले अन मार्गस्थ होऊ लागले. चहूकडे मिट्ट अंधार पसरला होता. वीजही पोचलेली नसावी अथवा लपंडाव खेळणारी असावी असं लक्षात आलं. दूरवर मिणमिणते दिवे दिसत होते.. एका सहप्रवाशाला धीर करून विचारलं, काहो मामा, गावचे सरपंच कुठे रहातात ?

त्याने त्या दूरवरच्या मिणमिणत्या प्रकाशाकडे बोट दाखवलं आणि मी लगबगीने त्या दिशेने निघालो. दमलो तर होतोच. पोटात भूकही भडकलेली होती. प्रचारकांच्या टिपिकल वेषात, दुटांगी धोतर-झब्बा आणि त्या काळची ती खाकी कॅनव्हासची बॅग अशा रूपात मी सरपंचांच्या घराच्या उंबरठ्यात जाऊन उभा राहिलो.. रॉकेलच्या दिव्याच्या धूसर प्रकाशात आतील काहीच स्पष्ट दिसत नव्हत. इतक्यात आतूनच आवाज आला-- या, या.. मी आत गेलो.. चला, पानं मांडलीच आहेत, तिकडे ओसरीवर पिशवी ठेवा, चौकातील हौदापाशी हात-पाय धुवून घ्या अन चलाच जेवायला..

केवढा मोठ्ठा पराक्रम केल्याच्या, काहीतरी जिंकल्याच्या आनंदाने मी आतल्या आत सुखावलो.. अजून ओळख-पाळख नाही अन एकदम चला जेवायला ? इतका माझ्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव ?

पान वाढलं.. जेवण सुरू झालं. मी स्वत:ची माहिती सांगितली, येण्याचं प्रयोजन सांगितलं.. दिवसभरात एकदाच येणारी बस सकाळी परत जात असल्यामुळे, मी म्हंटलं.. ’रात्रीच आपण गावकर्‍याना बोलवू शकाल काय ?’ "...." थोडी शांतता, मग म्हणाले अवश्य बोलवू, आधी पोटभर जेवा तरी..मुक्काम इथेच करणार ना ? मी अधिकच सुखावलो.. भोजन संपलं, हात धुवून आम्ही ओसरी जवळच्याच एका खोलीत आलो. अंधुक प्रकाशात मी खोली न्याहाळू लागलो.. नजर भींतीवर अधिक वर गेली.. तिथे दोन तसबीरी दिसल्या. डॉ. हेडगेवार अन श्रीगुरुजी ! मी चमकलोच.. म्हणालो, पाटील साहेब हे काय ? हे फोटो इथे ?.. .. हो, हो ! मी ही संघाचा स्चयंसेवक आहे. द्वितीय वर्ष शिक्षित आहे. रामभाऊ म्हाळगी सोलापूर जिल्ह्यात प्रचारक होते. (५० च्या दशकात) तेव्हां नेहमी आमच्या गावी येत असत. त्यांनीच येथे संघाची शाखा सुरू केली..कधी सायकल वर येत तर कधी पायी पायी...  आता शाखा बंद आहे. संपर्क तुटला आहे परंतु विचार अन संस्कार टिकून अहेत.. आतापर्यंत आकाशात तरंगत असलेला मी क्षणार्धात जमिनीवर आलो. डोळे खाडकन उघडले..

नंतर जिल्हा प्रचारक झाल्यावर हाच अनुभव, असेच रामभाऊंचे नाव मी गावोगावी ऐकत राहिलो. धन्य आहे त्या काळातील प्रचारक, अप्रचारक कार्यकर्त्यांची.. ज्यानी प्रवास, निवास, भोजन यातील गैरसोयींची, कष्टांची तमा न बाळगता झोकून देऊन वर्षानुवर्षे झपाटल्यासारखे काम करत राहिले..त्या परिश्रमांवर आज संघ उभा आहे. रामभाऊंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

Monday, May 10, 2010

सामीएट्टन

एक संघगीत है- ’ तू संघ संघ जप मंत्र निजांत रात्र ’.. हमारे गुरुश्री सामीएट्टन इस गीतका साक्षात प्रतिरूप थे. आर.एस.एस. उनका ’ ब्लडग्रुप ’ था और कळरी यह था ’ श्वास ’.. दिनरात इन्ही दो विषयोंमें उनका चिन्तन, मनन चलता था.

संघ के वे तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवक थे और कळरी की शिक्षा पारंपारिक पद्धती से अपने गुरू से प्राप्त की थी. वैसे वैद्यकीय विषय में उन्होंने कोई लौकिक शिक्षा नहीं पायी थी, लेकिन अपनी लगन से, गहन अध्ययन से, मूलगामी चिन्तन से उन्होंने उस विषय में भी बहुत उच्च स्थान प्राप्त किया था. अपने अनुभव के, अभ्यास के अधार पर वे किसी भी व्यक्ति का अचूक रोगनिदान तथा उसका कारन भी जान लेते थे. शारीरिक उपचार करते समय वे रुग्ण की मानसिकता को भी समझ लेते थे. शायद वे एक उत्कृष्ठ समुपदेशक भी बन सकते थे. रुग्ण के साथ गपशप करनेका उनका एक विशेष तरीका था. उसके मन की बात भी समझ लेते और अपने मन की बात भी उसे उतार देते थे. अनेक बार रुग्णोंके साथ बात करते करते उन्हे संघ भी समझाने का वे प्रयास करते थे.

उनका व्यक्तित्व अष्टावधानी था. उन दिनों कळरी में ही मसाज का काम भी चलता था. एकही समय वे रुग्णको मसाज करना और दूसरी तरफ़ नये विद्यार्थियों को कळरी के पाठ पढाना करते थे. उसी बीच कभी ओ.पी.डी. में पेशंट आता - जिसका हाथ या पैर टूटा हो - तो उसे भी ठीक करने स्वयं भाग निकलते थे, इतने में औषधशाला से भी उन्हें बुलावा आता था. सारे डिपार्टमेंट अकेलेही संभालते थे.

’ रुग्ण्सेवा ही ईश्वरसेवा ’ ऐसा उनका व्यवहार था. आये हुए रुग्णकी भोजन, निवास आदि व्यवस्थामें स्वयं ध्यान देते थे. १९८९-९० में जब मैं प्रथम बार बॅकपेन उपचार के लिये प्रमोदजी और रत्नाकरजी के साथ गया, तब मेरी दुर्बल शारीरिक स्थिती देखकर मेरे निवास की विशेष व्यवस्था की गयी थी. हमें कब, क्या चाहिये इस मनकी बात को वे बिना बताये समझ लेते थे और मॉंगने के पहलेही उसे पूरा कर देते थे. शायद उनका फेस रीडिंग भी अच्छा था.

उनकी और हमारी एक समान मैत्रीण थी वो याने ’चाय’. चायपान के साथ बहुतही उद्बोधक, मनोरंजक चर्चा चलती थी. संघ गीत भी उन्हें बहुत पसन्द थे. स्वयं अच्छे गाते थे. अपने दिनभर के सारे कष्ट, चिन्ताएं भूलनेका उनका सीधा मार्ग था - संघ गीत गायन ! हमसे अनेक मराठी गीत भी गा लेते थे.

उनका सारा जीवन कष्टमय ही था. पैसे की कभी चाह नहीं की. इस कारण आर्थिक स्थिति कमजोर रहती थी. परिवार का दायित्व भी था, बच्चे पढ रहे थे.. रुग्णोंको भी वे अपने घरका सदस्य जैसे ही मानते थे और वैसेही व्यवहार था. इस सारी सर्कस में उनको साथ देने उनके पीछे डटकर खडी थी हम सबकी शारदा अम्मा !

व्यक्तिगत जीवन में शारदा अम्मा की समर्थ साथ मिलने के कारण ही वे अपने काम में पूरी एकाग्रता से जुटे रहते थे. सुबह ५ बजे उनकी दिनचर्या शुरू हो जाती और अविश्राम काम के बाद देर रात ध्यान, जप के बाद ही समाप्त हो जाती थी. उनकी कळरी में सैकडों विद्यार्थि सीखकर गये और शायद हजारों रुग्णों को उन्होंने उपचार किये. कई बरसों तक यह सारा निरन्तर चलता रहा.. वास्तव में यह एक उग्र तपश्चर्या ही थी. वे अपनी तपश्चर्यामें, साधनामें सदा लीन रहे.. इसी घोर तपस्या से उन्होंने हिन्दुस्थान कळरी संघम की नींव डाली जिसपर आज भव्य प्रासाद खडा है.

अपनी धर्मपत्नी के साथ-साथ बच्चे भी अच्छे, सुसंस्कारित होना, यह दुर्लभ रहता है. लेकिन लक्ष्मणजी, शत्रुजी और राधिका ने अपने पिताजी के सारे कौशल्य आत्मसात किये और अपने निजी अभ्यास से अब आगे बढ रहे है. उन दिनों हमारी दुभाषी रहती थी राजेश्वरी चेची. और दि ग्रेट काऊन्सेलर थी रेगम्मा ! अब इस टोली में डॉ. लालकृष्णन जी भी जुड गये और आयुर्वेद विभाग शुरू हुआ. बहुएं राजलक्ष्मी और शिमी शारदाम्मा के सारे काम संभल रही है.. इस नेक्स्ट जनरेशन को अपने सारे कौशल हस्तांतरित करते हुए अचानक ही हम सब को छोडकर सामीएट्टन ’ निज आनंद धाम ’ में चले गये.उनकी पावन स्मृतीमें मेरे कोटि-कोटि प्रणाम !

-- उदय(मुंबई), रत्नाकर(पुणे)

Wednesday, April 28, 2010

सुमनताई

नोकरी, कौटुंबिक जबाबदारी आणि सामाजिक कार्य

यांची सुरेख सांगड घातलेला,
आमच्या लहानपणापासून आम्ही पाहिलेला,
चालता - बोलता आदर्श म्हणजे
आमच्या मातोश्री अर्थात
जोगळेकर बाई अर्थात
सौ. सुमनताई जोगळेकर !...


लेखनकला, वाचनकला, वक्तृत्वकला..
चित्रकला, संगीतकला, नाट्यकला..
अशा जगणे आनंदी करणाया अनेक गुणांची
पायाभरणी करणारी, उत्तेजन देणारी
आमची आई !...


माहेरची नाती, सासरची नाती आणि
रक्तापलीकडील नाती
जपणारी, सांभाळणारी, वाढवणारी
सुमन, सुमाताई, सुमनताई..


राष्ट्र सेविका समितीच्या कार्यात
स्वत:ला झोकून देणाया,
आपल्या दोन्ही मुलांना
पूर्ण वेळ सामाजिक काम करण्यास
संपूर्ण पाठिंबा व प्रोत्साहन देणाया..
आणि याच सामाजिक जाणिवा वेगवेगळ्या रूपात
आपली सून व आपल्या नाती
यांच्यातही उतरलेल्या पाहणाया
सुमनताई जोगळेकर...!


यांचे, ८१ व्या वाढदिवसा निमित्त
अ भी ष्ट चिं त न ! !



Wednesday, April 21, 2010

बापू

रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय श्री गुरुजी गंमतीने म्हणत असत, आगगाडीचा डब्बा हेच माझं घर आहे. सार्वजनिक कार्यासाठी स्चत:च्या देशाची ६०-६५ वेळा अखंड परिक्रमा करणार हे जगातील एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व असाव.. अशा श्री गुरुजीना विचारल-- आपल्या आरोग्याच रहस्य काय ? तर ते सांगत असत " बस, रोज २५ सूर्यनमस्कार व २-४ आसनं.." बहुधा आमच्या बापूंच्या आरोग्याचही रहस्य हेच असाव.. अगदी अखेरचे काही दिवस अपवाद वगळता बापूंना कधी आजार शिवलाच नाही. ना रक्तदाब, ना मधुमेह, ना पाठदुखी, ना पोटदुखी... व्याधी नाही, आजार नाही, पथ्य नाही कि औषध नाही.. असं मस्त मजेत आनंदात संपूर्ण आयुष्य जगले..लहानपणापासून माझ्या मनात काही क्षणचित्र ठसली आहेत त्यात ठसठशीतपणे आठवत ते सूर्यनमस्कार घालणारे बापू...

वयोमानानुसार त्यांच्या व्यायामाच स्वरूप बदलत गेल ते सकाळी शाखा व सायंकाळच्या पदभ्रमणावर स्थिरावल. सततोद्योग हा त्यांचा स्थायीभाव होता. कधी बागेतल्या झाडांना आळी करायचे, तर कधी घरासमोरचं आंगण मस्त चोपून कढायचे.. कधी बाज विणायला घ्यायचे तर कधी कुंपणावरच्या झाडांची सुरेख ’कटिंग" करायचे. त्यामुळे कुदळ-फावडे, विळा-खुरपे, झाडांना पाणी घालण्यासाठी झारी, तर वाढलेल्या झाडांच्या कटिंग साठी मोठाली कात्री हे सारे त्यांचे रविवार सुटीचे सवंगडी असायचे. त्यामुळे चांदणं पहात झोपाव अस मस्त आंगण आम्हाला लाभल होत. गुलाब, मोगरा, तगर, पारिजात, कृष्णकमळ, सोनटक्का यांचा दरवळ नि दिमाख घराभोवती पसरलेला असायचा तर पेरू, चिकू, जांभळं नि केळी यांची सदा रेलचेल असायची..

जसा सततोद्योग तसाच स्वच्छता, टापटीप व नीटनेटकेपणा हाही त्यांचा स्थायीभाव झालेला होता. कधी त्याबद्दल आदर वाटे तर कधी मनावर दडपण ! कपाटात क्रमवार व सम्यक मध्ये लाऊन ठेवलेली पुस्तकं, एकावर एक रचून ठेवलेले महिन्या दीड महिन्याचे पेपर.. असं वाटावं जणू आजच्याच ताज्या अंकाच्या पाच-पन्नास प्रती कुणी आणून ठेवल्या आहेत..इतका व्यवस्थित गठ्ठा ! एकता, युववाणी, विवेकानंद केंद्र पत्रिका, विवेक, यांचे सारे - पूर्णपणे वाचून झालेले - व नंतर काळजीपूर्वक जतन करून ठेवलेले अंक इथपासून ते किरकोळ रबर, पेन्सिल, टाचणी पर्यंत सारे काही शिस्तीत, नेमक्या जागेवर.. ! बापू कधी पुण्याला गेलेले असतील तर इथून फोन करून विचारावं, बापू पोस्टाचं तिकिट आपल्याकडे आहे का ?.. अन बपूंनी तिथूनच ते नेमकं कुठे आहे ते सांगावं..
कधी कुठल्या गोष्टीची उधळ-माधळ नाही कि तूट-फूट नाही... हा स्वभाव बनल्यामुळेच बापूंनी जशा वस्तु जमवल्या, जतन केल्या तशीच माणसंही जोडली, नाती जोपासली, वाढवत नेली..बोलक्या स्वभावाची माणसं मित्र-गोतावळा पटकन जमवतात पण, बापूंसारख्या अबोल माणसाने इतका मित्रपरिवार, आप्तजनांची नातीगोती कशी जोपासली असतील हे एक कोडंच वाटत..समोरच्या माणसाचं म्हणणं न कंटाळता शांतपणे ऐकत असत आणि त्यांच्या अभिप्रायाची चेहयावरील एखादी छोटीशी मिश्किल लकेरही समोरच्याच मन जिंकून जात असे..बापूंना जशी वस्तूंची पारख होती तशीच माणसांचीही. त्यामुळे प्रत्येकाची गुणवत्ता जाणणं, त्याच्या सुखदु:खाच्या प्रसंगी समरस होणं यातूनच त्यांनी माणसं जोडली, नाती वाढवली..

लहानपणापसून त्यांनी कधीच आमच्यावर आपली मते लादली नाहीत. शाखेत जावं न जावं, अभ्यासक्रम कुठला निवडावा इथपासून ते माझ्या प्रचारक जाण्यापर्यंत आपआपले निर्णय घेण्याच आम्हाला मुक्त स्वातंत्र्य होत. थोडा आग्रह, थोड स्वातंत्र्य.. शाखेत जायला हरकत नाही, पण साडेआठ च्या ठोक्याला घरात याव आणि अभ्यास करून मगच शाखेत जाव..अशी मार्गदर्शक सूत्र !

पर्यटन, पत्ते, अन चवीने खाणे ( पिणे अजिबात नाही ) हे बापूंचे खास आवडीचे विषय.. कधी पत्ते मंडळाबरोबर, तर कधी ऑफिस मंडळाबरोबर, कधी नातेवाईक मंडळी, तर कधी शाखेतील मंडळी.. बापूंनी भरपूर सहली केल्या, आनंदल्या ! दैनंदिनी द्वारे, छायाचित्रां द्वारे त्या स्मृतिबद्ध करून ठेवल्या..तब्बेत ठणठणीत असल्यामुळे चवीने खायचे, हौसेने खिलवायचे, घरातील डबे सतत भरून ठेवायचे.. ३०-४० वर्षांपूर्वीच्या जमान्यातही कधीतरी मजा म्हणून उपाहारगृहांचा आस्वाद घ्यायला घेऊन जायचे. दर मंगळवारी पुरे-पुरे म्हणेस्तोवर ऊसाचा रस पिण्याचा कार्यक्रम चाले..पत्ते म्हणजे एकदम वीक पॉईंट. त्यांचा ’ब्रिज’ मंडळ परिवार खूपच मोठा होता. परंतु, आमच्या सारख्या पोराटोरां बरोबरही रमी नि झब्बू, बिझिक नि कॅनेस्टर यांच्या मैफ़िली त्यानी रात्र-रात्र जागवल्या होत्या. एकटेच असले तर डाव मांडायचे आणि अलिकडे काळानुरूप संगणकावरही खेळायचे..

आमच्या आई-बापूंच्या सहजीवनाच साठाव वर्ष सुरू होत होतं. बापूंना पंखा ५ वर लागे तर आईला १ वर सुद्धा सोसत नसे. बापूंना जेवताना पानात गोड हवच तर आईला हवा खर्डा वा ठेचा.. असं हे तब्बल साठ वर्षांच सहजीवन.. दुसयाशी जुळवून घेणं, जमवून घेणं, प्रसंगी आपल्या आवडी-निवडी ला प्रत्येकानेच कधीतरी मुरड घालणं याचा कित्ता नकळतपणे एकत्र कुटुंबात गिरवला जातो. अशा तीन पिढ्यांच्या एकत्र कुटुंबात आम्ही वाढलो, समृद्ध झालो. बापूंच्या या कौटुंबिक, प्रापंचिक वाटचालीत म्हणूनच मोठं श्रेय आमच्या आईला सुद्धा जातं. बापू अंधश्रद्ध नव्हते पण सश्रद्ध जरूर होते. दर गुरुवारची आरती व प्रतिदिन पहिल्या चहापूर्वीचे प्रात:स्मरण या, साया कुटुंबियानी एकत्रितपणे करण्याच्या गोष्टी त्यांनी रुजवल्या. तरीही त्याना कर्मकांडाचे स्तोम मात्र मान्य नव्हते. म्हणूनच आपल्या उत्तरक्रिया-विधी संबंधी सुद्धा साधेपणाच्या सुस्पष्ट सूचना त्यानी लिहून ठेवल्या होत्या.

आमच्या ८-९ खोल्यांच्या घरात कुठल्याही गोष्टीची कधी कमतरता पडू दिली नाही, पण केवळ पैशाच्या मागे मात्र ते कधीच लागले नाहीत..वडील आयकर खात्यात आहेत म्हटल्यावर ऐकणारे म्हणायचे - व्वा, मग काय ?... पण आमचे बापू यात कधीच गुंतले नाहीत. उलट देवाच्या दयेने आणि गाळलेल्या घामाने जे मिळवलं ते जमेल तितकं देत रहाण्याचंच वळण होतं. अनेक संस्थाना, सामाजिक प्रकल्पाना दान करत राहिले. आपल्या सूनबाईंच्या कर्तृत्वावर त्यानी प्रथम श्रेणीची मोहर उमटवली होती तर दोन नाती व दोन नातजावई यांचही त्याना कोण कौतुक होत.. चौघांच्या माथ्यांवर मंगलाक्षतांचा वर्षाव करण्याची त्याना ओढ लागली होती, पण काळाची पाऊलंही त्यानी ओळखली होती. म्हणूनच तिकडची हाक आल्यावर अगदी कृतार्थ अंत:करणाने ते पुढील प्रवासास निघाले...व्यावसायिक जीवनातील शुचिता, कौटुंबिक जीवनातील धन्यता आणि सामाजिक कर्तव्याची पूर्तता करत त्यानी पुढील प्रवास सुरू केला.. कालाय तस्मै नम:... ...

Monday, April 19, 2010

आबा


डोंबिवली रा.स्व.सं.च्या इतिहासातील एका सोनेरी पानाच्या अत्यंत दुर्दैवी व करुण अशा दीर्घकथेचा अखेर पूर्णविराम झाला..संघात व्यक्तीला आदर्श मानीत नाहीत, परन्तु माझ्यासारख्या त्यावेळच्या तरुणांची एक मोठी पिढीच २ आबांकडे पहात-पहात संघकाम शिकली. एक आबा दातार व दुसरा आबा जोशी... माझ्या प्रचारक जीवनाचा प्रारंभ बिंदु, मनातील प्रारंभीची उत्कट प्रेरणा म्हणजे केवळ ’आबा’.. !
अविनाश दत्तात्रय जोशी - एक गोरंपान, ऊंचपुरं विविधांगी कर्तृत्व गाजवणारं प्रसन्न व्यक्तिमत्व ! उत्कृष्ठ गीत गावं तर आबाने, उत्कृष्ठ दंड फिरवावा तर आबाने, उत्कृष्ठ आनक वाजवावा तर आबाने आणि उत्कृष्ठ भाषण कराव तर ते ही आबानेच!जे करणार ते उत्कृष्ठ नि दर्जेदारच ! असा आपला आबा...
नगरपालिकेच्या मैदानावर भरणाया आमच्या छत्रपति सायं या जबरदस्त शाखेचा आबा जबरदस्त मुख्यशिक्षक ! शालेय वयातच जबाबदारी आलेला. योगायोगाने आबा ११ वीत असतानाच डोंबिवलीला माध्यमिक शालान्त परिक्षेचे केन्द्र सुरु झाले. पहिल्याच वर्षी डोंबिवली केंद्रात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला तो आबानेच व तो ही संघकामाची जबाबदारी असतानाच ! आबा तुला हे सार जमत तरी कस ?अस विचारल्यावर आबा सहजतेने सांगत असे.. "ज्या क्षणी मी अभ्यासाच पुस्तक उघडतो त्याच्या दुसयाच क्षणापासून तहान, भूक, शाखा, मित्र, साहित्य, संगीत इतकच काय आजुबाजुला असणार सार जगच मी विसरलेला असतो. केवळ दुसयाच क्षणापासून संपूर्ण एकाग्रता.
आपल्याला कधी अभ्यासाचा कंटाळा आला, शाखेतील कामात मरगळ आली, उद्विग्नता आली कि बिनधास्तपणे आबा कडे जाव आणि पुन्हा प्रसन्नचित्त होऊन परताव असा माझा परिपाठच होता..आबाच्या नेतृत्वाखाली झालेले पौर्णिमेच्या चांदण्यातील चंदनाचे कार्यक्रम, शाखा-शाखांचे कबड्डीचे सामने, शरीर व मने चिंब भिजवणाया वर्षा सहली, पावसाळ्यात तुडुंब भरणाया प्रत्येक विहिरीत मनसोक्त डुबक्या मारण, ताला-सुरांच्या साथीने रात्र रात्र रंगवलेल्या संघ गीतांच्या मैफिली.. हे सारे उपक्रम आबाच्या अष्टपैलु व्यक्तिमत्वाचे निदर्शक होते. आबाची काळानुरूप प्रयोगशीलता थक्क करणारी होती. ७४ च्या अणुस्फोटा नंतर लगेचच शाखेतील सर्वांसाठी आबाने एक बौद्धिक वर्ग आयोजित केला. विषय होता "अणुबॉम्ब.. भारताने केलेला स्फोट". अणुबॉम्बची संपूर्ण तांत्रिक, वैद्न्यानिक माहिती, तसेच त्याचे होणारे भौगोलिक व ऐतिहासिक परिणाम यांच सुंदर विवेचन सर्व बाल-तरुणांसमोर मांडल...चन्दू पेंढारकर, बाळ भिसे, सदा खंडागळे, बाळ पुराणिक, मोहन दातार, आबा जोशी, बाळ ढापरे हे जीवापाड मैत्री असणारे त्या काळातील शखेतील तरुण म्हणजे एकरस हिन्दु समाजाच सक्षात उदाहरणच सर्वांसमोर होत.
आबा
एम. एस. सी .विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला. विद्यापीठात दुसरा आला अन लवकरच आबाचा निरोप समारंभ ठरला.बयाच मोठ्या कालखंडानंतर डोंबिवलीतून एक गुणवान, धडाडीचा तरुण संघप्रचारक म्हणून बाहेर पडत होता. प्रारंभी भिवंडी व नंतर कुलाबा जिल्हा प्रचारक म्हणून आबाने काम केल आणि त्यानंतर डोंबिवलीतून प्रचारक जाणायांची एक मालिकाच सुरू झाली.
आबाला अत्यन्त बुद्धिमान व सामाजिक जाणीवा प्रगल्भ असलेल्या आई-वडिलांचा वारसा मिळाला. आणि पुढे आबाइतक्याच गुणांनी, प्रखर बुद्धिमत्तेनी, सामाजिक कार्यातील सहभागानी कर्तृत्ववान अशा - मुंबई विद्यापीठात तत्वद्न्यान विषयाच्या प्रमुखपदी असलेल्या शुभदाताईंची जीवनसाथ मिळाली. या दोघा प्रतिभावान माता-पित्यांच प्रतिबिंब उमटलेली मुले अमोघ व वेदवती... तितकाच समर्थ असा ज्येष्ठ बंधु अनिलराव यांचा परिवार नि महाडच्या जोशी घराण्यात हा वारसा पुढे चालविणाया त्या वेळच्या अभाविप च्या कार्यकर्त्या भगिनी अरुणाताई... अस हे मातृछायातील जोशी कुटुंब म्हणजे ६०-७०-८० च्या काळातील संघकार्यकर्त्यांच एक हक्काच, वर्दळीच आश्रयस्थान होत.
डोंबिवलीतील महाविद्यालयात आबाने व्याख्याता म्हणून प्रवेश केला आणि त्याच्या जीवनातील दुर्दैवाचा आलेख सुरू झाला.कोणकोणत्या व्याधी आबाला जडल्या नि घरच्यांनी काय काय प्रकारे उपचारांची शर्थ केली त्याच तर वर्णन करणच कठिण आहे. ज्यांनी खळाळत्या प्रवाहाप्रमाणे असलेला आबा पाहिला होता त्याना अलिकडे पुतळ्या प्रमाणे स्तब्ध झालेली आबाची मूर्ति पाहून आतून भडभडून येत असे.
आज आबा शरीराने सुदृढ असता तर प्रांतिक, अ.भारतीय स्तरावर.. कदांचित विश्व विभागाच्या कामातही मोलाची भर पडली असती. अशी गगनाला गवसणी घालण्याची क्षमता अंगी असणाया आबाची विकल शारीरिक स्थितीतून, दुर्दैवी नि करुण अशा अवस्थेतून अखेर परमेश्वरानेच सुटका केली... ... मला खात्री आहे, नव तेज, नवी कांती घेऊन पुन्हा आबा आपल्यात येइल.. सुदृढ संघकार्य अन विकसित भारताच्या निर्मितीत आपणा सर्वांच्या हातात हात गुंफण्यासाठी... .. ...